Posts

Showing posts from May, 2015
 श्रावणाच्या सरिसारखा ओथंबून टाकणारा तुझा सहवास ..... सावळ्या मेघांच्या गर्जनेसारखा उन्मळून टाकणारा तुझा श्वास …। प्राणात उचंबळून येणारे निळे गर्द मेघ पिवळ्या सोनसळी उन्हांसारखा नि हिरव्या तृणांचा मखमली स्पर्श नि हिरव्या तृणांकुरासारखा सर्जनोत्सुक हर्ष ……… आत आत कुठे रे साकळते ते घननीळ आकाश प्राणात माझ्या दाटून येतो निळा  -निळा  कृष्ण श्वास …. उघड आता तुझ्या चैतन्याची दारं …। भरून    घेऊ दे मला श्वासात श्रावणी वारं 
या वयातही  आठवणींना  बहर येतो ,खरे आहे , वठलेल्या झाडांनाही पालवी फुटते खरे आहे , म्हाताऱ्या क्षितिजावरही रोज तांबडं फुटतं खरं आहे, सायंकाळच्या सुर्यालाही पहाटेची स्वप्न पडतात खरं आहे ओढ्या-नदी झर्यामधून पाणी वाहतेच आहे ,खरं आहे ग्रीष्माच्या रणरणत्या उन्हातही माणसाची तहान भागतेहेही खरं  आहे सनातन चंद्रातूनही  शीतल  चांदणं पाझरत आहे ,हेही खरच आहे  रोज उगवणारा सूर्यही नवा-नवाच वाटतो आहे …. हे सगळं खरं आहे तर माणूसच का रडतो आहे ? आपल्याच खोट्या दुखांनी उगीच विव्हळत आहे…… तुटले पंख तरी नवी भरारी मारायची असते …… पराभूत झालात तरी कात नवीन टाकायची असते ……। मग रोज सूर्य नवा होतो पहाट हसरी होते …….  .   गोळाबेरीज शून्यं असली तरी जगणे सार्थक होते